Pages - Menu

Sunday, November 15, 2015

दीपावलीत अंधार

दीपोत्सव चांगला चार दिवस चालला. चांगला झाला की नाही ही गोष्ट वेगळी. खरं तर लोकसंख्या येव्हढी वाढलेली आहे, की कितीही जनजाग्रुती केली आणि त्यामुळे फटाके लावणाऱ्यांचे प्रमाण कितीही कमी झाले तरीही फटाके लावणऱ्यांची संख्या गत वर्षांपेक्षा बरीच जास्त असायला हवी होती. ती तेव्हढी नव्हती, आणि ते जनजाग्रुतीमुळे घडले असे वर्तमानपत्रवाल्यांचे मत पडले. संख्याशास्त्र आणि ठोस पुरावा यांचा अशा बातम्यांशी फारसा संबंध नसतो असे म्हणतात. तेव्हा ही कारणमीमांसा खरी की खोटी हे ठरवण्यासाठी आपण या फोटोकडे पाहूया.


भाऊबीजेच्या दिवशी काढलेला हा फोटो किती घरांमध्ये दिवे आणि आकाशकंदील दिसत होते ते दर्शवितो. सर्वत्र हीच परिस्थिती होती, त्यामुळे एकच फोटो दाखविणे पुरेसे आहे. या इमारतीतील बारा घरांपैकी अवघ्या तीन घरांत दीपावलीची रोषणाई दिसते आहे. ऐन दीपावलीत १२ पैकी ९ घरांत अंधार आणि खाली एटीएम् आणि दुकानांत लखलखाट हे चित्र पुरेसे बोलके आहे. महागाईने कंबरडे मोडलेली इतकी कुटुंबे दीपावली अंधारात काढावी लागते या दुःखात असताना आनंदोत्सव साजरा करणाऱ्यांना अपराधी वाटून त्यांचा आनंद कमी तर झाला नसेल ना?
(Keywords: Diwali dark)