Sunday, October 4, 2015

चुकीचे औषध


बुरी नजरवाले तेरा मुँह काला


आटपाट नगर रोजच्या कामाच्या धावपळीत होते. राजवैद्यांची धावपळ तर सामान्य जनांच्या धावपळीपेक्षा नेहमी जास्त असायची. पण आज धावपळ बाजूला ठेवून ते भ्रुकुटी वक्र करून उभे होते.
"काही कमी पडले काय सरकार?" सेवकाने त्यांना अदबीने विचारले.
"अं.."राजवैद्यांची विचारांची श्रुंखला भंगली.
"आपण नाराज दिसता आहात. काही कमी पडले काय?" सेवक म्हणाला.
"नाही. मी आताच आलेल्या स्वच्छता अभियानाच्या परिपत्रकाबद्दल विचार करतो आहे. सर्व वैद्य, अधिकारी यांनी स्व्च्छता अभियानाला एक वर्ष झाले म्हणून पंधरा दिवस अधिक जोराने स्वच्छता करावयाची आहे."
"सरकार, आम्ही सेवक स्वच्छता करावयास असतांना आपणाला हे काम करावयास का सांगितले आहे?"
"वरिष्ठांनी आज्ञा दिली की उलट प्रश्न विचारला तर पूर्वी जीभ कलम करत असत. आता तसे करत नसले तरी विभागीय चौकशी, शिस्तभंगाची कारवाई वगरे गोष्टींचा बडगा तर आहेच" राजवैद्य म्हणाले.
"सरकार, लहान तोंडी मोठा घास घेतो आहे. पण लोकांनी घाण करावयाची आणि आपण ती स्वच्छ करावयाची हे साफ चुकीचे आहे. साम, दाम, दंड, भेद वापरून लोकांना घाण करण्यापासून पराव्रुत्त करणे हे जास्त योग्य वाटते."
"अगदी योग्य बोललास रे बाबा" राजवैद्य म्हणाले. "पण दिल्लीच्या तख्ताकडून आदेश येतात, आणि आपल्याकडे त्यांचे आंधळेपणे पालन होते. विचार करतो कोण? आजच्या राज्यकर्त्यांची हीच मोठी शोकांतिका आहे आणि त्यामुळे देश रसातळाला जातो आहे हे जाणवतेय म्हणून मी व्यथित आहे."
"जी सरकार" असे म्हणून सेवक व्यथित चेह~याने स्वच्छतेच्या कामाला गेला.

प्रशंसा करायचीय, नावे ठेवायचीयेत, काही विचारायचय, किंवा करायला आणखी चांगले काही सुचत नाहीये, तर क्लिक करा.

संपर्क