Thursday, October 8, 2015

कपडे धुण्याची नवी पद्धत

आटपाट नगरच्या राजाच्या रुग्णालयातील गोष्ट आहे. सलग दुस~या वर्षी पाउस कमी पडला होता. राज्यात पिण्याच्या पाण्याची ददात झाली होती. शेते कोरडी पडली होती. शेतकरी आत्महत्या करीत होते. टॅंकर करून आठवड्यांतून एकेकदा गावा गावाला पिण्यासाठी पुरवले जात होते, ज्यासाठी लोक अवाच्या सव्वा पैसे मोजत होते. सर्वत्र अशी परिस्थिती होती तरी रुग्णसेवेवर परिणाम होऊ नये म्हणून राजाच्या रुग्णालयात मात्र चोवीस तास पाण्याचा व्यवस्थित पुरवठा होत होता. एकदा राजवैद्य एक शल्यक्रिया करून निघाले होते. हात धुण्यासाठी ते गेले तर त्यांच्या नजरेला काय अकल्पित द्रुष्य पडले.


नळ उघडा होता. त्याच्यातून धो धो पाणी वाहत होते. पाण्याच्या धारेखाली शल्यक्रियेत वापरलेला, रक्ताने भरलेला कपडा पडलेला होता.
"अरे, हे काय आहे? हा नळ असा उघडा का ठेवला आहे?" राजवैद्यांनी सेवकाला विचारले.
"सरकार, त्याचे रक्त धुवून निघावे म्हणून तो कपडा वाहत्या पाण्याखाली ठेवला आहे" सेवकाने अदबीने उत्तर दिले.
"अरे. राज्यात दुष्काळ पडला आहे. लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही आहे. आणि तुम्ही पाणी असे फुकट घालविता?" नळ बंद करता करता राजवैद्यांनी विचारले.
"सरकार, सर्वच शल्यक्रियाग्रुहांत रक्ताने माखलेले कपडे याच पद्धतीने धुतात" सेवक म्हणाला.
"आजपासून हे बंद करा. कपडे चोळून धुवा."
राजवैद्यांच्या म्हणण्यावर सेवकाने होकारार्थी मान हलविली खरी, पण ते नसताना रक्ताने माखलेले कपडे त्या जुन्याच पद्धतीने धुतले जात राहिले. हे राजवैद्यांनाही समजले. ही पद्धत त्यांनी राजाकडून फर्मान काढवून बंद करण्याचा प्रयत्न केला. पण सेवक राजालाही जुमा्नायचे थांबले.
"जित्याची खोड मेल्यावाचून जात नाही ते खरे" राजवैद्य हताश होऊन म्हणाले. "या गुन्ह्यासाठी महाराज देहांताची शिक्षा सेवकांना देणार नाही, आणि पाण्याचा अपव्यय असाच सुरू रहाणार."

प्रशंसा करायचीय, नावे ठेवायचीयेत, काही विचारायचय, किंवा करायला आणखी चांगले काही सुचत नाहीये, तर क्लिक करा.

संपर्क