Saturday, September 12, 2015

सातवा वेतन आयोग

आटपाट नगरच्या राजाच्या रुग्णालयात मानसिक हल्लकल्लोळ झाला. कोणा एका वरिष्ठ वैद्याच्या व्हॉ्ट्सॅपवर नवा संदेश आला. तो सातव्या वेतन आयोगाबद्दल होता. सरकारी कर्मचा~यांचे वेतन ठरविण्यासाठी सरकार वेतन आयोग नेमत असे. आतापर्यंत असे सहा वेतन आयोग होऊन गेले होते. आता सातव्या वेतन आयोगाचे काम चालू होते. वरिष्ठ  वैद्यांनी त्याचे स्वतः वाचन करून झाल्यावर परत इतरांसाठी सामूहीक वाचनही केले.
"आपला पगार वाढवून मिळण्यासाठी आता सातवा वेतन आयोग येणार आहे. आता आहे त्यापेक्षा वेतन तर जास्त मिळेल. त्यामध्ये वैद्यांच्या सेवानिव्रुत्तीच्या वयाची अट समाविष्ट आहे. ज्या दिवशी आयोगाच्या अटी लागू होतील त्या दिवशी ज्यांचे वय ५० असेल ते सर्व वैद्य सेवानिव्रुत्त होतील."
फक्त तरुण वैद्य सोडले तर सर्वच वैद्यांचे वय ५० च्या वर होते.
"असे झाले तर सर्व वरिष्ठ आणि मधल्या फळीतले वैद्य सेवानिव्रुत्त होतील" एक वैद्य म्हणाले. "मग राजाचे रुग्णालय चालविणार कोण?"
"जर वरिष्ठ वैद्य नसतील तर रुग्णालयाची आणि त्याला जोडलेल्या महाविद्यालयाची मान्यता रद्द होईल" दुसरे एक वैद्य म्हणाले. "मग तरुण वैद्यांची नोकरीही जाईल."
"आजकाल माणसाचे आयुर्मान ८० पर्यंत वाढले आहे. जर मी सेवानिव्रुत्त झालो तर उरलेली ३० वर्षे मी काय करायचे?" तिसरे एक वैद्य म्हणाले.
"बायकोचे डोके खायचे" एक कनिष्ठ वैद्य पुटपुटले. "आमच्या मागची कटकट त्या बिचारीच्या मागे लागेल."
हा सर्व हल्लागुल्ला चालू होता तेव्हढ्यात दुस~या विभागाचे एक वैद्य आले. त्यांच्या व्हॉ्ट्सॅपवर एक वेगळाच संदेश आला होता. तो त्यांनी वाचून दाखविला.
"सातव्या वेतन आयोगानुसार जेव्हा तो लागू होईल तेव्हा ज्यांचे वय ६० असेल किंवा ज्यांची सेवा ३३ वर्षे झाली असेल ते सर्व सेवानिव्रुत्त होतील."
दहा वर्षे वाढवून मिळतील असे दिसले तरीही वैद्यांचे समाधान होईना.
"आयुर्विज्ञान परिषद म्हणते की वैद्यांचे सेवानिव्रुत्तीचे वय ७५ करा. महाराजांच्या नियमाप्रमाणे आपले सेवानिव्रित्तीचे वय ६२ आहे. ते वाढवायचे की कमी करावयाचे?" ६२ वे वर्ष पूर्ण व्हावयास थोडेसे महिने उरलेले एक वैद्य म्हणाले.
"अजून ४ वर्षांचा सेवाकाळ शिल्लक आहे म्हणूना मी मोठे ग्रुहकर्ज घेतले आहे. आता मी सेवानिव्रुत्त झालो तर मी ते कर्ज फेडणर कसे?" दुस~या एका वैद्यांनी विचारले.
राजवैद्यांकडून पूर्वनियोजीत सभेसाठी बोलावणे येईपर्यंत हे सर्व संभाषण उलट सुलट चालूच राहिले. इतका वेळ गप्प असण~या एक वैद्यांना दुस~या वैद्यांनी विचारले, "आपले मत आपण मांडले नाही?".
"आयोगाचा कार्यकाळ अजून चार महिने आहे. तो संपेल तेव्हा काय ठरले ते समजेल. तोपर्यंत कासावीस होण्याचा काहीही फायदा नाही. म्हणून मी गप्प आहे."

प्रशंसा करायचीय, नावे ठेवायचीयेत, काही विचारायचय, किंवा करायला आणखी चांगले काही सुचत नाहीये, तर क्लिक करा.

संपर्क