Friday, June 5, 2015

आग्यावेताळ

गुरुजींच्या महाविद्यालयात एक दुसरे गुरुजी होते. त्यांचे वय गुरुजींच्या वयापेक्षा जास्त असले तरी ते गुरुजींना सेवेत कनिष्ठ होते, कारण सेवाज्येष्ठता ही शिक्षण, अंगभूत गुण, कार्य वगैरे अनेक गोष्टींवर अवलंबून असे. हे दुसरे गुरुजी अतिशय खाष्ट होते. बारीक बारीक गोष्टींवरून ते हाताखालच्यांना आणि त्यांच्या विद्यार्थ्यांना धारेवर धरत असत आणि अगदी नको जीव करून टाकत असत. गुरुजी त्यांचे वरिष्ठ असूनही ते त्यांच्या मेंदूलाही आपल्या वर्तनाने मुंग्या आणत असत. सर्वांनी त्यांचे नांव आग्यावेताळ गुरुजी असे ठेवले होते.
राजाकडे शिक्षणसंस्थांचे नियम मोठे कडक होते. मनांत आलेल्याला शिक्षक म्हणून नेमता येत नसे. त्यामुळे शिक्षकांचा तसा तुटवडा जाणवत असे. वरिष्ठ शिक्षक सेवानिव्रुत्त झाले की जर त्याच दर्जाचे नवीन शिक्षक मिळाले नाहीत तर विद्यालयाची मा्न्यता जाण्याचा धोका असे. अशी परिस्थिती आली की राजा शिक्षकांच्या सेवानिव्रुत्तीचे वय वाढवत असे. म्हणजे आजचे मरण उद्यावर ढकलण्याची गोष्ट म्हणा ना. पण राजाच्या अंगी इतर अनेक गुण असले तरी दूरद्रु्ष्टीचा अभाव होता. त्यामुळे योग्य वेळी नवीन शिक्षकांच्या नेमणुका करण्याऐवजी तो तहान लागली की विहिर खणायला घेत असे. अशा विहिरी्तून पाणी थो्डेच मिळते. मग राजा शिक्षक मिळत नाहीत म्हणून सेवनिव्रुत्त होणा~या शिक्षकांचे सेवानिव्रुत्तीचे वय वाढवीत असे. त्यामुळे ते शिक्षक खूश झाले तरी कनिष्ट शिक्षक नाराज होत असत. कारण त्यांना बढती मिळणे तेव्हढ्या वर्षांनी पुढे ढकलले जात असे. राजाने आतापर्यंत सेवानिव्रुत्तीचे वय ५८ वरून ६० आणि नंतर ६० वरून ६२ करून झाले होते. आता राजा ते ६३ करण्याच्या विचारात होत, आणि नंतर ते ६५ करण्याचाही प्रस्ताव विचाराधीन होता.
जेव्हा हा ६३ चा प्रस्ताव येऊ घातला तेव्हा गुरुजींनी कपाळाला हात लावला, कारण आता आग्यावेताळ गुरुजी आणखी एक वर्ष आपल्याला त्रास देणार हे त्यांच्या लक्षात आले. या विषयावर सर्व कनिष्ठ शिक्षकांनी संपावर जाण्याचा जाहीर इशारा दिला. पण आग्यावेताळ गुरुजींच्या हाताखाली काम करणा~या तीन शिक्षकांनी तर कमालच केली. ही गोष्ट गुरुजींना विभागांत काम करणा~या एका व्यक्तीकडून समजली.
"गुरुजी, ते तीन शिक्षक म्हणत होते की जर का राजाने सेवानिव्रुत्तीचे वय आणखी एक वर्षाने वाढविले, तर ते तिघेही राजीनामा देऊन नोकरी सोडून जातील. ते अगदी कंटाळलेत या आग्यावेताळ गुरुजींना. आग्यावेताळ गुरुजी सेवानिव्रुत्त झाल्यावर जर राजाने ते वय ६३ केले तर त्यांची हरकत नाहीये."
"अहो, मला त्यांचे दुःख समजतय हो. मी स्वतः आग्यावेताळ गुरुजींना वरिष्ठ असूनही इतका कंटाळलोय, की कधी कधी मुदतपूर्व सेवानिव्रुत्ती घेऊन येथून बाहेर पडावे असे मला वाटते."
"मग?"
"मी सेवानिव्रुत्त झालो तर आग्यावेताळ प्रमुख् शिक्षक होतील आणि सगळ्यांना रोज छळतील म्हणून मी येथे टिकून राहिलोय."

प्रशंसा करायचीय, नावे ठेवायचीयेत, काही विचारायचय, किंवा करायला आणखी चांगले काही सुचत नाहीये, तर क्लिक करा.

संपर्क