Tuesday, June 9, 2015

कलियुगाची नांदी

आटपाट नगरीच्या राजाच्या रुग्णालयाची दुरुस्ती करण्याची वेळ आली तेव्हा छताचा मुलामा रुग्णांच्या आणि वैद्य, परिचारिका, आणि सेवकांच्या डोक्यावर पडू लागला होता. स्वच्छताग्रुहांमध्ये वरच्या मजल्याच्या तत्सम जागेतून पाणी किंवा सद्रुश द्रव गळू लागला होता, आणि रुग्णालयाची इमारतच लौकरच कोसळेल अशी भिती सर्वांना वाटू लागली होती. इमारत राजेशाही होती. राजाने तिच्या दुरुस्तीसाठी आपल्या अभियांत्रिकी विभागाला पाचाराण न करता ते काम एका विलक्षण चतुर स्थापत्यशास्त्रज्ञावर सोपविले. त्याने कामाचा आराखडा बनविला आणि कामासाठी निविदा मागविल्या. बाजारभावापेक्षा एक त्रितीयांश कमी दराने निविदा भरणा~या ठेकेदाराला काम देण्यात आले. त्याने योग्य त्या व्यक्तींना उचित अशा भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला, आणि मग कामास सुरुवात केली. भेटवस्तू दे्ण्यात अमाप पैसा खर्च झाला होता. निविदा कंबरडे मोडेल अशा कमी दराची होती. खर्च वजा जाता थोडा तरी फायदा होणे अपेक्षित होते. त्यामुळे केवळ परिस्थितीपुढे मान तुकवून त्याने अशातशा प्रकारचे साहित्य वापरून जमेल तसे काम उरकले. चकचकीत दिसणा~या रुग्णालयांत परत रुग्णसेवा सुरू झाली. एका महिन्यांत छताचा मुलामा परत पडावयास सुरुवात झाली. भिंतीच्या फरशा निखळून खाली पडू लागल्या. स्वच्छताग्रुहांत वरच्या मजल्यावरच्या तत्सम जागेतून परत द्रव गळू लागला. वैद्यांनी आणि परिचारिकांनी तक्रारी केल्या, त्यांना केराची टोपली दाखविण्यात आली.
"हे असे का?" वैद्यराजांनी विचारले.
"योग्य त्या ठिकाणी भेट म्हणून पेट्या आणि खोके दिले की मग असे होते" असे त्यांना एका माहितगाराने सांगितले.
"म्हणजे काय ते मला समजले नाही" वैद्यराज म्हणाले.
"येणा~या कलियुगाची ही नांदी आहे वैद्यराज" माहितगार म्हणाला.
"निदान स्वच्छताग्रुहांत तरी पाणी गळू नये" वैद्यराज म्हणाले. "बिचा~या रुग्णांना ती एक गोष्ट तरी निर्विघ्नपणे करता यावी."
वैद्यराजांच्या समाधानासाठी म्हणून त्या चतुर स्थापत्यशास्त्रज्ञाला पाचारण करण्यात आले. त्याने वैद्यराजांचे म्हणणे नीट ऐकून घेतले.
"त्याचे काय आहे वैद्यराज" स्थापत्यशास्त्रज्ञ म्हणाला, "स्वच्छताग्रुहांच्या जमिनींत क्षार जास्त प्रमाणात आहेत. ते क्षार पाणी शोषून घेता आणि त्यामुळे गळती होते."
"पण जमीन फुटली म्हणून तुम्ही संपूर्ण स्लॅबच बदलली हो्ती ना?" वैद्यराजांनी विचारले. "मग क्षार आले कोठून?"
"अहो, आपल्याला मी काय सांगायचे? मनुष्याच्या मूत्रामध्ये क्षार ब~याच जास्त प्रमाणात असतात. ते गळतीबरोबर जमिनीत जातात." असे म्हणून स्थापत्यशास्त्रज्ञ वैद्यराजांचा बिरोप घेऊन निघून गेला.
नवी स्लॅब घातल्यावर जमीन पाणी झिरपणार नाही अशी बनवतात, तर मग क्षार जमिनींत गेले कसे असे वैद्यराजांना विचारायचे होते, पण तोपर्यंत स्थापत्यशास्त्रज्ञ आपल्या रथांत बसून राजाच्या स्थापत्य विभागाच्या अमात्यांच्या महालात पोचला होता.
"वैद्यराज, आपली मुद्रा अशी व्यथीत का?" असे त्यांना कोणितरी विचारले.
"कलियुगाची नांदी झाली हो" असे वैद्यराज विषण्णपणे म्हणाले.

प्रशंसा करायचीय, नावे ठेवायचीयेत, काही विचारायचय, किंवा करायला आणखी चांगले काही सुचत नाहीये, तर क्लिक करा.

संपर्क